Saturday, July 30, 2022
सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदारे यांना स्मशानभूमीसाठी जागा मिळावी अशा आशयाचे निवेदन वीरशैव लिंगायत सामाजिक संघटना सिन्नर
Thursday, July 28, 2022
शिरोळ तालुका लिंगायत समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
Monday, July 25, 2022
मुरिगेप्पा चेंन्ननावार ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव
मुरिगेप्पा चेंन्ननावार ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव
मुरिगेप्पा चेंन्ननावार ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव
सातारा, दि.25 -प्रा अजय शेटे प्रतिनिधी
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आयोजित केल्या गेलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल स्पर्धेत श्री. मुरीगेप्पा चेन्ननावार यांनी हि सायकल शर्यत अतिशय योग्य अवधीत जलद गतीने पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे.
याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.धीरजराय चौधरी यांच्या सहीने त्याला खास प्रशस्ती पत्र व सुवर्णपदक खास बक्षीस म्हणून बहाल करण्यात आले आहे.
आपल्या या मोहिमेबद्दल मुरिगेप्पा यांनी सांगितले की,आपण सर्व आदरयुक्त व्यक्तींना मला हे सांगताना आनंद व अभिमान वाटतो की,सर्वात उत्कृष्ठ सायकलपटू कोण हे पाहण्यासाठी ही काश्मीर ते कन्याकुमारी ' के 2 के ' स्पर्धा म्हणजे तरुणांनी सर्व प्रकारच्या व्यसनांना पहिल्यांदाच नकार देण्याची मानसिकता तयार करण्यासाठी आयोजित केली गेली होती.या स्पर्धेची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस' मद्ये होणार होती.माझ्यातील उत्कृष्ठ सायकल पटूला यातून स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करण्यासाठी आव्हान होते.या मोहिमेत मी एकूण 3649 किमी सायकल चालवली.या वेळी नऊ राज्यांचा प्रवास करावा लागला .तसेच यामध्ये श्री वैष्णोदेवी, कटरा, जम्मू- काश्मीर ते कन्याकुमारी अशा दुर्गम भागातून प्रवास करायचा होता.
मी त्यासाठी ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालखंडात भरपूर सराव केला होता.यावेळी सदानंद अमरापूर नावाचा माझा मित्र हा मदतनीस सहकारी होता.याच वेळी कन्नड अभिनेता व कर्नाटक रत्न तसेच थोर मानवता वादी कार्यकर्ता पूनित राजकुमार यांच्या मृत्यूची सल माझ्या मनात होती.तसेच त्यावेळी मला माझ्या काही आरोग्याच्या तक्रारींना अचानक पणे सामोरे जावे लागले.त्यामुळे माझ्या कौटुंबिक डॉक्टरांनी मला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता पण मला जास्त काळ या अडचणीत अडकायचे नव्हते.
त्यानंतर जवळ जवळ तीन महिन्याच्या प्रदिर्घ विश्रांती नंतर मी mazi' K2K - अँटी ड्रग ' अर्थात व्यसन विरोधी सायकल मोहीम सुरू केली व ' व्यसन विरोधी दूत ' बनून मोहिमेला सुरुवात केली.यावेळी माझ्याबरोबर माझा जिवलग मित्र प्रशांत हिप्परगी हा होता.एक महिन्याचा अधिक विश्रांती नंतर मी ' जम्मू - काश्मीर ते कन्याकुमारी ' ( तामिळनाडू ) अशी सायकल फेरी पूर्ण केली.
त्यामुळे मी माझ्या सर्व सहकारी व हितचिंतक यांचा खूप खूप आभारी आहे की , ज्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद यांच्या मुळे ही अवघड सायकल मोहीम मी पूर्ण करू शकलो.
तसेच मी खास करून माझी आई ,पत्नी व मुले तसेच माझे मोहिमेतील सहकारी प्रकाश चंन्ननवार ,अक्षय चनागौदर व डॉ.सोहेल यांचाही खूप खूप आभारी आहे. कारण या सर्वांनी रात्रंदिवस केलेल्या सहकार्यामुळेच मी ही मोहीम पूर्ण करू शकलो. माझे या मोहिमेचे यश मी अभिनेता कै.पुनीत राजकुमार यांच्या पवित्र स्मृतिस अर्पण करतो.
वीरशैव इंटरनॅशनल व लिंगायत टिव्ही लाईव्ह, लिंगायत समाज , तसेच
समस्त भारत वासियांच्या वतीने या सर्व चमूचे हार्दिक अभिनंदन व त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न
खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न
खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न
खानापूर:दि २५ ;- शिवकुमार कल्याणी प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातिल खानापूर येथे दिनांक २२/७/२२ रोजी ससहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर श्रीमती सौम्या शर्मा यांनी परिसंवाद साधला असुन ग्रामपंचायत खानापूर येथे दिव्यांग बांधवांची बैठक घेऊन दिव्यांगा सोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे
उपजिल्हाधिकारी श्रीमती सौम्या शर्मा मॅडम यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे दि २२ रोजी दुपारी दिव्यांग बांधवांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस गावातील सर्व दिव्यांग बांधव, श्रवणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना, च्या सर्व लाभार्थ्यी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तेव्हा मा.साह. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित लाभार्थ्यांसोबत आधार कार्ड, राशन कार्ड, अपंग प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र बाबत चर्चा करून ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यांची यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस केले तसेच वरील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या गावात ॒दिवंगमित्र॒ निवड करण्यात येईल असे सांगितले.
तसेच ग्रामपंचायत खानापूर येथील सुविधा केंद्र अद्यावत करून दिव्यांगाना योजना मिळवून देण्यासाठी माहितीपत्रक लावण्यात यावे अशा सूचना दिल्या ,आणि गावातील एकही दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी दिवंगमित्र यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी गरज पडल्यास संसाधन व्यक्तीची निवड करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या, यानंतर ग्रामपंचायत मार्फत चालू असलेल्या कामाची माहिती गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्याकडून घेऊन दिव्यांग बांधवांना पंधरावा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीच्या पाच टक्के निधी वितरित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले,
ग्रामपंचायती कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षारोपणाबाबत उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील रस्त्याची विकास कामे पाहणी करत असताना अतिक्रमीत असलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करून कामे करावे त्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन गावातील नागरिकांना दिले. त्यानंतर खानापुर येथील जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता, पाणीपुरवठा, विकास कामे पोषण आहार, ची पाहणी करून विद्यार्थिनीशी संवाद साधला. व विद्यार्थ्शी संवाद साधला यावेळी या कार्यक्रमास गटविकास अधिकारी शेखर देशमुख गटशिक्षणाधिकारी कृषी अधिकारी श्री ईडोळे , विस्तार अधिकारी दयानंद सूर्यवंशी ,संगमेश्वर कानडे, खानापूर महसूल चे मंडळ अधिकारी तलाठी अनिल सरगर हे उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक खानापूर चे ग्रामविकास अधिकारी श्री गणेश कोकणे यांनी केले तर उपजिल्हाधिकारी श्रीमती शर्मा यांचे स्वागत व सत्कार खानापूरचे सरपंच सौ. उज्वला गौतम वाघमारे व जि.प.सदस्या अनुराधा पाटील यांनी केले त्यावेळी उपसरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य आनंत पाटील, विश्वनाथ ताडकोले, नागेश्वर बक्कनवार भीमराव यनलवार शेषराव कदम गौतम वाघमारे मारोतराव परबते , रवींद्र कामशेट्टे व अशोक डुकरे, दयानंद मठवाले सुरेश बक्कनवार , प्रहार दिव्यांग संघटना तालुका संघटक उमाकांत अटकळे व सर्व दिव्यांग बांधव व गावातील जेष्ठ नागरिक , महिला व प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Saturday, July 23, 2022
मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी मा.मंगेश चिवटे यांची नियुक्ती करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
Friday, July 22, 2022
भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून मा.द्रौपदी मुर्मू यांची निवड स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली तसेच भारताची दुसरी महिला राष्ट्रपती .प्रा,अजय शेटे, वडूज.विशेष लेख
Wednesday, July 20, 2022
गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा-- सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी
गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा--
सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी
गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा--
सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी
सिन्नर { नाशिक ] दि.१८: श्यामसुंदर झळके लिंगायत TV Live प्रतिनिधी
सिन्नर हे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून येथे श्री गोंदेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे.बाराव्या शतकातील प्रारंभास साधारण ११६० च्या सुमारास हे मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद आहे.भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ४ मार्च १९०९ मध्ये घोषित केले आहे.हे मंदिर हेमाडपंथी दक्षिण स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. गोंदेश्वर मंदिरामुळे सिन्नरच्या सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडली आहे.हे मंदिर पाहण्यासाठी भारतभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.सिन्नर बारागाव पिंप्री रस्त्यावर सिन्नर न्यायालयाच्या मागे हे पुरातन मंदिर आहे.विशेष म्हणजे गोंदेश्वर मंदिराच्या पर्यटन विकासासाठी तसेच सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यातून विविध अनेक कामे मार्गी लागतील.परंतु आश्चर्याची व खेदाची बाब म्हणजे या मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची फजिती होते.बसस्थानका पासून ते विचारपूस करता करता वावीवेस पर्यंत येऊन सरळ बारागावपिंप्री रस्त्याने खरजे मळ्यात गोंदेश्वर मंदिराच्या मागील भागात पोहचतात तर काही सरळ कानडी मळ्यात पेट्रोलपंपापर्यंत जाऊन माघारी येतात.यामुळे पर्यटकांची तारांबळ उडते तसेच त्यांचा वेळ वाया जातो व शेवटी साधा बोर्ड नगरपालिकेला लावता येत नाही का अशी प्रतिक्रिया कानावर पडते. विशेष म्हणजे या परिसरात न्यायालय,तहसीलदार, पोलीस ठाणे व अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत.परंतु गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा फलक नाही याचा खेद वाटतो.याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नाही. तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करते. नेमके हे काम कोणाच्या अधिकारात येते हा प्रश्न सिन्नरकरांच्या मनात कायम आहे.
श्री. गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक
फलक लावावा या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सागर मुंदडा याच्याकडे देताना सामाजिक
कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके
सिन्नर येथील सामाजिक
कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांनी या बाबत नुकतेच नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना
निवेदन दिले असून त्यात लवकरात लवकर गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक
लावावा अशी मागणी केली आहे.श्रावण महिना
तसेच महाशिवरात्री ला भाविकांची गर्दी होत असते, थोड्याच दिवसात
श्रावण महिन्याचे आगमन होत आहे.या पार्श्वभूमीवर हा फलक लावावा अशी अपेक्षा
निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
Monday, July 18, 2022
वीरशैव धर्म हाच खरा सनातन धर्म आहे गुरु गंगाधर शिवाचार्य
मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस दिला मोबाईल निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांचे दातृत्व वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
Sunday, July 17, 2022
जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ बिनविरोधमा.सुरेंद्रदादा गुदगे व मा.अनिल भाऊ देसाई यांची वर्णी ..
Saturday, July 16, 2022
रखडलेला महामार्ग बनला जीवघेणा ! त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी शिवकुमार कल्याणी
Friday, July 15, 2022
श्रीमती कुसुम बर्डे यांचे वृद्धापकाळानी निधन
Thursday, July 14, 2022
खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन
खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन
खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन
सातारा, दि.14 -प्रसाद वाकडे प्रतिनिधी
देशाचे नेते आ. खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे हा भव्य असा नोकरी मेळावा होणार आहे.तरी खटाव - माण तालुका व सातारा जिल्हा मधील सर्व युवक युवतींनी याचा लाभ घावा .असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च , पर्वती,पुणे 09, व राजर्षी शाहू ॲकाडमी ,पुणे तसेच ग्लोबल टॅलेंट ट्रॅक,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इनॅगुरल फॅन्क्शन व कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन शुक्रवार दि.15 जुलै 2022 रोजी सकाळी 9.30 वा.पासून पुढे संध्या.5.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे .
यावेळी मा.शशिकांतजी सुतार, मा.प्रमिला गायकवाड मॅडम, मा.संदिपजी कदम , मा.भगवानराव साळुंखे , मा.विजयसिंह जेधे,प्राचार्य मा.सुनील ठाकरे ,प्रा.दिगंबर पवार यांची उपस्थिती राहून त्याचे खास मार्गदर्शन होणार आहे .
या नोकरी मेळाव्याचे ठिकाण ए. बी.एम.एस.परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व रिसर्च ,शाहू कॉलेज कॅम्पस , पर्वती,पुणे 411009 येथे आहे.
सदर रोजगार मेळावा महाराष्ट्र शासन पुरस्कृत ऑल इंडिया सर्टिफाईड ट्रेनिंग एज्युकेशन मार्फत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेशी सलग्न आहे.तसेच नॅक मानांकन आयएसओ 9001.2015 ने मानांकित आहे.
या रोजगार मेळाव्यात 30 पेक्षा अधिक कंपन्या मध्ये नोकरीची संधी प्राप्त होणार आहे तसेच आय टी, बी.एस.एफ.आय., मॅन्यूफॅक्चरिंग व फार्मा क्षेत्रातील जवळ जवळ 1000 इतक्या पदांची भरती करण्यात येणार आहे.
या साठी उमेदवारांनी आपले कोविड लस घेतल्याचे सर्टिफिकेट फोटो कॉपी,दोन पासपोर्ट साइज् फोटो आणि वैयक्तिक माहिती पत्र च्या एकूण 10 प्रती घेवून वेळेत हजर रहावे.
सदर रोजगार मेळावा सर्व ग्रज्यूए ट,पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनीअरींग उमेदवार,आर्ट्स,कॉमर्स तसेच मॅनेजमेंट क्षेत्रातील नवीन व अनुभवी अशा उमेदवारांसाठी आहे.तसेच उमेदवारांच्या सोयीसाठी स्कॅन कोड रजिस्ट्रेशन ची सोय करण्यात आली आहे.
तरी सदर रोजगार मेळाव्यातील नोकरीची संधी जास्तीत जास्त तरुण मुले - मुली यांनी प्राप्त करून घ्यावी व आपले उज्वल भवितव्य घडवावे.असे आवाहन माजी सनदी अधिकारी व माण - खटाव तालुक्याचे विद्यमान नेते मा. प्रभाकररावजी देशमुख साहेब यांनी केले आहे.
Wednesday, July 13, 2022
लान्स नायक मा.रमाकांत लामतुरे यांचा भव्य नागरी सत्कार .
Sunday, July 10, 2022
देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे . शेतकऱ्यांच मोठे नुकसान
देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे . शेतकऱ्यांच मोठे नुकसान
देगलूर खानापूर.दि.१० ;- शिवकुमार कल्याणी (प्रतिनिधी )
देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे नदी,नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले असून, शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे, प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येते आहे, कधी आस्मानी तर कधी सुलतानी अशा संकटांचा सामना या भागातील शेतकरी करीत आहेत,अत्यंत महागामोलाचं बि- बियान,कर्ज काढून काळ्या आईच्या उदरात मोठ्या उमेदीने त्यांनी पेरले होते,व अनेक स्वप्ने पाहिली होती कि या वर्षी तरी निसर्ग साथ देईल व आपलं काहीतरी भलं होईल असे वाटत होते, अत्यंत कष्टाने केलीली मेहनत एका पुराण वाहून नेली.अजून तरी पाऊस चालूच आहे असाच पाऊस चालू राहीला तर अत्यंत भयान परिस्थिती उद्भवेल.गावातील व खानापूर महसूल मंडळातील अनेक शेतकऱ्यांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदरील शेतकऱ्यांच्या शेतीचे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी....!
Thursday, July 7, 2022
खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप..!मुलांचे आरोग्य धोक्यात ,?????
Wednesday, July 6, 2022
विटा मर्चंटस को. ऑ. बँक निवडणुकीत जय सहकार पॅनेल चे सर्व उमेदवार विजयी विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी यांची रणनिती यशस्वी
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
वीरशैव लिंगायत समाज , कोल्हापूरच्या वतीने स्नेह मेळावा उस्थाहात संपन्न, वीरशैव लिंगायत समाज , कोल्हापूरच्या वतीने स्नेह मेळावा उ...
-
म.बसवेश्वर महामंडळाला स्वायत्त दर्जा बहाल. मा.ओमप्रकाश तथा काका कोयटे. म.बसवेश्वर महामंडळाला स्वायत्त दर्जा बहाल. मा.ओमप्रकाश ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...