श्री आद्य जगदगुरु
रेणूका चार्य जयंती वीरशैवानी मोठया भक्ती भावाने साजरी करावी.. ईश्र्वरस्वामी.. होळी मठ यांचे भावनिक आवाहन..
..सातारा.. दि.15....प्रा.अजय शेटे.. वडूज. विशेष लेख
बुधवार दि.16 मार्च 2022 रोजी श्रीआद्य जगद्गुरू रेणूकाचार्य यांची जयंती आहे.जगातील सर्व धर्मांमध्ये वीरशैव हा एक प्राचीन धर्म मानला जातो.या धर्माला प्राचीन इतिहास असून युगायुगांची परंपरा लाभली आहे. इष्टलींग धारणेच्या वीर व्रताचे प्रबोधन करणारा .. पंचसुत के नाकारणारा .. अन्य धर्मांना विरोध न करता त्यांच्यात समनव्यय साधण्याचा उपदेश करणारा..लिंग दिक्षे मध्ये वर्ण..जाती..लिंगभेद न पाळणारा.. लिंगांग सामरस्यं बोधक विद्द्येत रममाण व्हा असा उपदेश करणारा असा हा धर्म होय.या धर्मात व्यक्तीची योग्यता व उत्कट शिवभक्ती पाहून ..तिच्या जातीचा विचार न करता दिक्षा दिली जाते.दिक्षेनंतर सर्वांना शिवस्वरूप मानण्यास हा धर्म सांगतो.
..या धर्माने उद्योगाचे व श्रमाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे.स्वकष्टार्जित संपत्ती प्रथम शिवार्पण करून नंतर गुरु..लिंग..जंगम यांना आणि समाजातील दुर्बल घटकांना दान करून मग तिचा उपभोग घेण्यास सांगितले आहे.त्याप्रमाणे अन्न देखील शिवा र्पित करून प्रथम भुकेल्यास देवून नंतर स्वतः ग्रहण करण्यास सांगितले आहे.अशी शिकवण देणारा जो धर्म आहे.त्याला वीरशैव धर्म म्हणतात.
.. वेद..आगमव उपनिषद् यातून वरील तत्वांचे प्रतिपादन केले आहे. हि तत्वे लोक मनात बिंब व ण्या साठी शिवाच्या आज्ञेने पंच शिवगणांनी लिंगा तून प्रादूर्भुत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली असे परंपरा मानते.हे पंच शिवगण म्हणजेच पंचाचार्य असून हेच वीरशैव धर्माचे संस्थापक होत.या शिवगणानी अनुक्रमे कृतयुगात एकाक्षर..द्युक्षर.. त्र्यक्षर..चतुरक्षर.. व पंचाक्षर या नावांनी त्रेता युगात एकवकत्र.. द्विवक्र.. त्रिवक्र.. चतुर्वक्र .. व पंचवक्र या नावांनी ..द्वाप्रारयुगात रेणुकदारुक..घंटा कर्ण..धेनु कर्ण.. व विश्व कर्ण या नावांनी आणि कलियुगात रेवणाराध्य .. मरुळाराध्य.. एकोरामाराध्य ..पंडिताराध्य व विश्वाराध्य या नावांनी अवतार घेतला.पंचाचार्यांनी रंभापुरी..उज्जयिनी..
केदार.. श्रीशैल व काशी क्षेत्र येथे पंच पिठांची स्थापना केली . हीचं वीर शैवांची महापिठे होत.
..पंचाचार्यांच्या या दिव्य परंपरेतील श्री जगद्गुरू रेणुकाचार्य हे रंभापूरी पिठाचे आचार्य होते.फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला तेलंगणा प्रांतातील सुप्रसिद्ध कोल्ली पाकी क्षेत्रातील सोमेश्वर महा लिंगातून ते प्रादूर्भूत झाले.या प्रदेशाला ' श्रीसिद्धांत शिखामनी ' त त्रिलींग देश असे म्हटले जात असे.या शिवाय इष्टलींग ..प्राण लिंग व भाव लिंग या त्रिलिंगाची पूजा करणाऱ्या वीर शैवांची संख्या या प्रदेशात अधिक असल्यामुळेही याला त्रिलींग देश असे म्हटले आहे.
श्री शैल मल्लिकार्जून..कोल्ली पाकी सोमेश्वर..आणि द्राक्षाराम क्षेत्रातील भीम नाथ ( रामनाथ ) हि तीन लिंगे या प्रदेशात असल्यामुळे याला त्रिलींग देश असे म्हटले जात असे.
..या शिवाय इष्टलिंग ..प्राणलिंग व भावलिंग या त्रिलिंगांची पूजा करणाऱ्या वीर शैवांची संख्या या प्रदेशात अधिक असल्यामुळेही याला त्रिलिंग देश असेही एक मत आहे.विशेष म्हणजे सोमेश्वर लिंगातून रेणुका चार्य ..भीमनाथ लिंगातून एकोरामाराध्यव मल्लिकार्जून लिंगातून पंदितराध्य यांचा उद्धार झाल्यामुळे हि तीनही लिंगे वीरशैवांची श्रद्धास्थाने होत.
..सोमेश्वर लिंगातून प्रादुर्भूत झाल्यावर श्री जगद्गुरू रेणुकाचार्य आकाश मार्गाने मलय पर्वतावर गेले.आणि तेथे अगस्त्य महर्षीं ना त्यांनी शिवद्वैताचा उपदेश केला.तोच उपदेश श्री शिवयोगी शिवाचार्यानी ' श्रीसिद्धांत शिखामनी ' या ग्रंथात ग्रंथित केला आहे. महर्षी अगस्ति नी प्रत्यक्ष श्रीरामाला आदित्यहृदय कवचाचा उपदेश केला होता.अशा थोर अगस्त्य ऋषिना दिक्षा देवून आणि शिवद्वैवता चा उपदेश करून त्यांच्या मनातील संदेह जगद्गुरू रेणुका चार्य यांनी दूर केला .यावरून त्यांचे थोरपणही सहज लक्षात येते.
.त्यांनी जो उपदेश केला त्याचा सारांश अशा प्रकारे सांगता येईल .धर्म हा आचरणासाठी असतो.अहिंसा.. अस्ते य..सत्य..ब्रह्मचर्य.. दया..क्षमा..दान..पूजा..जप.. व ध्यान यांचे आचरण करणे म्हणजे धर्म होय.धर्माचरण केल्यामुळे व्यक्तित्वाचा विकास होतो.आणि व्यक्तित्व विकसित झाले मुळे समाजाचे कल्याण साधते.धर्माचरण करताना अन्य धर्म तत्वांचे खंडन करू नये.शिवदिक्षा घेतलेल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये.जीवाचा अध्यात्मिक विकास होऊन त्याला शिवभाव प्राप्त व्हावा यासाठी षट स्थलांचे आचरण करावे. षटस्थ लातील 101 उपस्थले म्हणजे मानवी मनाचा क्रम बद्ध विकासच होय.जगद्गुरू रेणुकाचार्या नी अगस्त्य महर्षिना पदविडी सूत्रांचा उपदेश केला. पडविडी म्हणजे पद विधी होय.श्रीगुरु ला शरण गेल्यावरच कोणतेही तत्व प्राप्त करून घेता येते.असा या सूत्राचा अर्थ होय.दिक्षाविधी स्पष्ट करताना सामाजिक असमानता दूर करण्याचा त्यांनी जसा उपदेश केला त्याप्रमाणेच सोपाधिक.. निरुपाधिक व सहज असे दान प्रकार सांगून आर्थिक असमानता दूर करण्याचीही शिकवण दिली .याशिवाय जे लोक शिव यात्रा करतात त्यांच्यासाठी अन्न व जलाची व्यवस्था करण्यास सांगितले.श्री.रेणुका चार्य हे एक महान पुरुष होते. शुद्धा चरण ..शुद्ध विचार आणि
अष्टमहासिद्धी या गुणांनी ते संपन्न होते.तीन कोटी आचार्या ची रूपे धारण करून त्यांनी श्रीलंकेत त्रिकोटी लिंग स्थापना केली.असे ते महासिद्ध पुरुष होते.त्यांनी कलियुगात रेवण सिद्ध या नावाने अवतार घेतला.आद्य शंकराचार्यांना लिंग प्रदान केले.कोल्हापूरच्या गोरक्ष राजाचे गर्वहरण केले.कांची मध्ये वरद राज मूर्तीचे शिरकंपन थांबविले.अशा त्यांच्या अनेक चमत्कार कथा ' रेणूका विजय पुराणात ' वर्णिलेल्या आहेत.अशा या महान रेणुका चार्य स्वामींची जयंती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी ..बुधवार दि.16 मार्च रोजी सर्व वीरशैवानी अवश्य साजरी केली पाहिजे व त्यांनी जो महान उपदेश केला त्या बद्दल त्यांना मानवंदना दिली पाहिजे .असे अधिकार वाणीचे आवाहन ईश्वर स्वामी होळीमठ यांनी सर्व वीरशैवाना केले आहे.