प्रा.अजय शेटे यांना केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .
प्रा.अजय शेटे यांना केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .
सातारा, दि.27 - रविंद्र वाकडे
केंद्र शासनाची शाखा असलेल्या ,भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सन 2023 सालाचा उल्लेखनीय सामाजिक कार्य पुरस्कार वडूज , ता.खटाव, जि.सातारा येथील रहिवासी प्रा.अजय शेटे यांना नुकताच प्रदान करण्यात आला . शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,मानाचा फेटा,सन्मान चिन्ह, पदक ,प्रशस्तीपत्र व रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवार दि.26 रोजी , सौभाग्य मंगल कार्यालय, पाटण रोड,उंब्रज येथे दुपारी 11 ते 3 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुणे मंडलच्या अध्यक्षा श्रीमती मिनाक्षीताई पोळ,संघाचे राष्ट्रीय ऑर्गनायझिंग सेक्रेटरी मा. शैलेश कुमार गौतम , गव्हर्निंग बॉडी महाराष्ट्र अध्यक्ष शांती कुमार बोडके,प्रदेशाध्यक्ष बनसोडे सर्,सातारा जिल्हा महासचिव गोरख खाडे,जिल्हा अँक्शन कमिटी अध्यक्ष योगेश पोळ,दिशा केंद्रीय समिती सदस्या संगीता साळुंके,, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुनंदा देसाई या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जातात. मजदूर लोकांसाठी सामाजिक,आर्थिक व कौटुंबिक विकासाचे अनेक उपक्रम राबवले जातात.त्यासाठी समाजातील तडफदार व उल्लेखनीय काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांच्या कार्याची यथोचित दखल हा संघ घेत असतो.त्यामुळेच अशा व्यक्ती या संघाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरतात.
या पुरस्काराबद्दल प्रा.अजय शेटे म्हणाले की, मी समाजाच्या निकोप प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या अत्यावश्यक मागण्या शासन दरबारी करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केला. समाजात कार्य करताना चांगले काम करत रहायचे व अन लगेच सोयीस्कर रित्या विसरून जायचे,फळाची अपेक्षा ठेवायची नाही.रोज चांगले पेरत रहायचे.किती उगवल याचा विचार करायचा नाही.समक्ष चांगले काम होत असताना सुद्धा लोक त्याकडे डोळेझाक करतात.कौतुकाचे चार शब्द पण बोलत नाहीत.प्रसंगी स्व - स्वार्थासाठी अन्याय करण्यास पण मागे पुढे पहात नाहीत. अशी जळकट विचारांची कंजूस माणसे पावलोपावली आढळतात.तसेच समाजात अमाप पैसा असलेली अनेक गरीब दरिद्री माणसे असतात .पण भारतीय मजदूर संघ या संघटनेने व त्यांच्या समतुल्य संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या सामाजिक कार्याची अप्रत्यक्ष दखल घेवून माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा माझी या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करून मला खरोखर आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच माझे कौतुक करून मला खरोखर आणखी चांगल्या कार्यासाठी प्रेरणा दिली आहे.ती कायम स्मरणात राहील. या संघटनेत खऱ्या अर्थाने विचारांची श्रीमंती आढळली आहे.त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.या पुरस्कार प्राप्ती बद्दल श्री.युवराज काटकर,सौ.काटकर मॅडम,श्रीमती पद्मिनी कळसकर, सौ.शारदा भस्मे,श्री.शिंदे ,सौ.शिंदे मॅडम यांनी खास अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाला संघटनेचे संपूर्ण भारत व महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी स्त्री - पुरुष उपस्थित होते.या कार्यक्रमात भारत देशप्रेम ,शिवगर्जना ,प्रतिज्ञा,राष्ट्रगीत असे अनेक उपक्रम सादर करण्यात आले.
सर्वांना चहा,पाणी,नाष्टा,जेवण,थंड पेये ,यांची सोय संघटने तर्फे उत्तम प्रतीने केली गेली होती.