भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी .
भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी .
सातारा, दि.8 - रविंद्र वाकडे विशेष लेख
भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मु.पो. कोळे, ता.कराड, जि.सातारा गावचे थोर सुपुत्र ,आशिया खंडातील सर्वात मोठ्या फोर्जिंग उद्योग समूहाचे प्रमुख मा.बाबासाहेब कल्याणी यांनी अतिशय दूरदृष्टी व देशप्रेम डोळ्यासमोर ठेवून ' भारत फोर्ज ' या कंपनीचा विस्तार व प्रगती केली आहे.आजच्या त्यांच्या 74 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आजपर्यंत तब्बल 25 कोटी रुपये ' पी.एम. केयर फंड ' मध्ये योगदान दिल्याचे जाहीर केले आहे.
आज सर्वात श्रीमंत मराठी माणूस असलेले कल्याणी कुटुंब हे मूळचे शेतकरी कुटुंब.त्यांचा वडिलार्जित व्यवसाय हा आडतीचा होता.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कुटुंबातील थोरले पुत्र मा.निळकंठराव कल्याणी यांनी मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या बरोबर मोठे कार्य केले.त्याचा परिणाम म्हणजे मा. निळकंठराव यांचे तंत्र शिक्षण अपूर्ण राहिले.परंतु 1961 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली.आणि औद्योगिक क्रांती जोम धरू लागली.त्यामुळे जेष्ठ उद्योजक मा.शंतनुराव किर्लोस्कर व मा.निळकंठराव कल्याणी यांना एकत्र करून मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्रांतीला चालना देण्याचे महत्त्वाचे काम केले.
आणि त्यानंतर मा.नीलकंठ राव कल्याणी यांनी 1966 मध्ये वेगळी अशी ' भारत फोर्ज ' ही कंपनी स्थापन केली.सुरुवातीला या कंपनीने इलेक्ट्रिक व कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक संसाधने तयार केली.
त्यानंतर 1971.72 ला भारत पाकिस्तान युद्ध तसेच चीनशी होणारे मतभेद हे लक्षात घेवून भारत देश हा संरक्षण क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक बनत गेले.त्यामुळे पुढे लगेच 1972 साली मा.बाबासाहेब कल्याणी यांनी आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीमध्ये वयाच्या 23 व्या वर्षी प्रवेश करून कंपनीची सर्व सूत्रे हातात घेवून भारतीय लष्कराला आवश्यक असणारे संरक्षण साहित्य बनविण्यास सुरुवात केली.आणि त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य ठरला.
मा.बाबासाहेब कल्याणी यांचा जन्म 8 जानेवारी 1949 रोजी झाला.त्याचे शिक्षण हे बेळगाव येथील मिलिटरी स्कूल मध्ये झाले.पुढे पुणे येथे येवून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयर ही उच्च विद्या विभूषित पदवी संपादन केली.त्यावेळी त्यांना भारतीय लष्करातील मोठे अधिकारी होण्याची संधी प्राप्त झाली होती.परंतु आपला जन्म केवळ लष्करी वर्दी घालून मशीनगन हातात धरण्यासाठी झाला नसून आपल्या शिक्षणाचा उपयोग हा संपूर्ण देशाचे रक्षण करण्यासाठी झाला आहे.असे मानून त्यांनी अमेरिका येथे जावून 'एम.आय. टी ' ही अतिशय उच्चविद्याविभूषित पदवी संपादन केली. व तेथे पण त्यांना नोकरी मिळत असताना केवळ मातृभूमीच्या रक्षणाचे काम करण्यासाठी ते भारतात माघारी आले व त्यांनी ' भारत फोर्ज ' ची सूत्रे हाती घेतली.त्यांच्या सुरुवातीच्या क्रांतिकारी निर्णयामुळे त्यावेळचे कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी नाराज झाले व त्यांनी त्यांना असहकार करण्यास सुरुवात केली.परंतु स्वतःच्या व्यवस्थापन गुणवत्तेवर त्यांनी त्या सर्वांना पुन्हा आपले निर्णय कसे योग्य आहेत.हे दाखवून देवून पुन्हा कंपनीवर मजबूत पकड मिळवली ती आज पर्यंत. आज वयाचा 74 वा वाढदिवस साजरा करून रौप्य महोत्सवी अशा 75 व्या वर्षात त्यांचे पदार्पण होत आहे.
भारतीय संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरविणाऱ्या कंपनीचे मालक म्हणून बाबासाहेब प्रसिद्ध आहेत.पुणे ,मुंडवा व हैद्राबाद तसेच जगात अनेक ठिकाणी कंपनीचे खूप मोठे असे उद्योग विश्व आहे.भारतीय हवाई दल , नौदल,पायदळ यांना लागणारे अतिशय अत्याधुनिक असे संरक्षण साहित्य ही कंपनी पुरविते.
अवजड वाहने ,रायफल्स,मशीन गन्स,बंदुकीच्या गोळ्या, दारुगोळा,विमाने,जहाजे,क्षेपणास्त्रे,
तोफा , अवजड वाहने. हेलिकॉप्टर्स ,विमाने..
या त्यांनी ' मेक इन इंडिया ' या धोरणावर अतिशय दर्जेदार अशा बनवून जागतिक उद्योगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आज' भारत फोर्ज ' ही कंपनी अमेरिका ,जपान ,जर्मनी या देशांशी जागतिक करार करून संरक्षण क्षेत्रातील उत्पादने,अवजड ट्रक्स व वाहनांचे ॲक्सल सह इतर महत्वाचे स्पेअर पार्टस तयार करत आहे.तसेच सन 1990 पासून ही कंपनी फोर्जिंग,मारुती उद्योग समूह,मर्सिडीज बेंझ उद्योग समूह यासारख्या तब्बल 10 हजार उद्योग समूह व त्यातील इंजिनीयर तसेच कुशल कामगार यांना बरोबर घेवून अंबानी , अदाणी या उद्योग समूहाच्या बरोबरीने पहिला मराठी उद्योग समूह म्हणून ' कल्याणी उद्योग समूह ' काम करत आहे.त्यामुळे भारतातील सर्वात मोठी मराठी कंपनी म्हणून ' भारत फोर्ज ' व सर्वात पहिला श्रीमंत मराठी उद्योगपती म्हणून बाबासाहेब कल्याणी यांचे नाव संपूर्ण जगात व भारतात मोठ्या आदराने घेतले जात आहे.
भारत सरकारने या कंपनीची वेगवान भरारी पाहून मा.बाबासाहेब कल्याणी यांना सन 2008 साली ' पद्मभूषण ' हा सर्वात मानाचा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला आहे. ' डी.आर. डी. ओ ' या अतिशय मोठ्या अशा भारतीय संरक्षण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या सरकारी कंपनीच्या समवेत आज सर्वात शक्तीशाली अशी ' हँवित्झर ' तोफ बनवण्यात मोठे यश आले आहे.त्यास ' भारत -52 ' असे जागतिक नामकरण मिळाले आहे.अतिशय अत्याधुनिक व लाईटवेट साक्षात शत्रूसमोर व त्यांच्या विमानासमोर गोळ्यांच्या अभेद्य भिंती उभ्या करणाऱ्या रायफल्स व मशिनग न्स यांची निर्मिती वेगाने सुरू आहे.सौदीअरेबिया चे संपूर्ण संरक्षण साहित्य विशेष सुरक्षेचा करार करून ' भारत फोर्ज ' पुरवत आहे.तसेच ' सी. डी.पी. ' ही जर्मनीची आंतरराष्ट्रीय कंपनी पण त्यांनी खरेदी करून भारतीय उद्योगपतींचा दबदबा जगात वाढवला आहे.
त्यामुळे ' भारत फोर्ज ' या कंपनीला 'मल्टीनॅशनल ' कंपनी करण्याचे सर्व श्रेय हे मा.बाबासाहेब कल्याणी यांना जाते. 'आत्मनिर्भर भारत ' बनवून भारताला महासत्ता बनविण्याच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे खरेच वाखाणण्यासारखे आहे.उद्याच्या गौरवशाली भारतासाठी ही मोठी यशाची नांदी आहे.सातारा नगर पालिकेला स्वइमारतीसाठी आपल्या स्वतःच्या मालकीची जागा केवळ 1/- रुपया या दानफळ किमतीत विकून मा.बाबासाहेब कल्याणी यांनी आपले आपल्या जन्मभूमी सातारा जिल्ह्याचे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.कल्याणी उद्योग समूहातर्फे शासनाच्या विविध योजना व त्या अंतर्गत केली जाणारी विकास कामे तसेच गावस्वरुपी अनेक शेती,पाणी रस्ते,वीज अशी व इतर विकास कामे यांना ' तन - मन - धन ' अर्पण करून मदत केली जाते.
' कारखाना हेच देवालय,मशीन हाच देव आणि दर्जेदार उत्पादन हिच भक्ती ' ही त्रिसूत्री अंगी बाणवून मा.बाबासाहेब कल्याणी यांनी केलेली विकासात्मक प्रगती म्हणूनच अतिशय उल्लेखनीय अशी आहे.
आज या महान उद्योगपतीचा
74 वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना लिंगायत TV Live चॅनेल ,,वीरशैव लिंगायत समाज संघटना उंब्रज ,सातारा , लिंगायत संघर्ष समिती ,
समस्त भारतीय उद्योग विश्व व जनतेतर्फे वाढदिवसाच्या अब्ज - अब्ज शुभेच्छा व 75 व्या अमृत महोत्सवी कारकिर्दीस सुयश शुभचिंतन .