बसवेश्वर जयंती निमित्ताने लिंगायत मठ ते तहसीलदार कार्यालया पर्यंत भव्य रॅली आणि तहसीलदार कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन.व विविध कार्यक्रमाचे आयोजन
Wednesday, April 19, 2023
बसवेश्वर जयंती निमित्ताने लिंगायत मठ ते तहसीलदार कार्यालया पर्यंत भव्य रॅली आणि तहसीलदार कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन.व विविध कार्यक्रमाचे आयोजन
Sunday, April 16, 2023
साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम येथे सामाजिक उपक्रमाने साजरा.
साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम येथे सामाजिक उपक्रमाने साजरा.
साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम येथे सामाजिक उपक्रमाने साजरा.

कडेगाव दि १६ :- अंश खलीपे
रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांचे पुतणे चि.साईश खलिपे याचा प्रथम वाढदिवस आणि चि.इंद्रनील खलिपे याचा चौथा वाढदिवस रुद्राक्षा फौंडेशन संचलित अंशजल सामाजिक वाढदिवस या उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
आजच्या कलियुगात वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांना वृद्धांबद्दल आस्था व प्रेम संपत चालले आहे. हे असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की, घरात मुलांना संस्कार द्यायला आजी-आजोबाच राहणार नाहीत. लहानपणापासूनच मुलांना योग्य संस्कार दिले तर ती मुलं मोठी झाल्यानंतर देखील आपली कर्तव्य विसरत नाहीत. याचाच विचार करत रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांचे वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम, येळावी येथील वृद्धांसमवेत केक कापून सर्वांना नाश्ता देऊन साजरा केला. तसेच पोलीस फाट्यावरील ऊसतोड कामगार व त्यांच्या लहान मुलांना खाऊवाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे, फौंडेशनच्या सचिव सौ.शोभा खलिपे, गोविंद वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ. अलका पाटील, शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अमरदीप खलिपे व सचिव श्रीकांत खलिपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सौ.अलका पाटील म्हणाल्या, आजकालच्या पिढीने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून असे कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांचे वाढदिवस वृद्धाश्रमात येऊन साजरे केले आणि आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल त्यांचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांना कोणत्याही गोष्टीची पैशाची अपेक्षा नसते त्यांना फक्त याकाळात प्रेमाची जास्त गरज असते आणि तेच प्रेम आज संपूर्ण खलिपे कुटुंबीयांनी येथे वृद्धांसमवेत वेळ घालवून, त्यांच्याशी बोलून, त्यांची विचारपूस करून दिलेले आहे. येथून पुढे देखील रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.अंश खलिपे व त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून असे कार्य घडत राहो हीच सदिच्छा.
वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी इंद्रनील व साईश यास आशीर्वाद देऊन त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी सौ.पूजा खलिपे, चि.इंद्रनील खलिपे, चि.साईश खलिपे व वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबा उपस्थित होते.
लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
कराड दि १६ :- रविंद्र वाकडे
राष्ट्रीय लिंगायत संघ यांचे वतीने सांगली येथे 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.संपन्न.
या वेळी बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष चे मंगेशजी चिवटे म्हणाले की लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे ,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांना मदत करत आहोत या मुळे महात्मा जगद्गुरू महात्मा बसवण्णा यांना अभिप्रेत असणारे समाज कार्य माझ्या हातून घडत आहे हे मी माझे भाग्य समजतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना सुरेश भाऊ खाडे या वेळी बोलताना म्हणाले कि महात्मा बसवेश्वर महाराजांनी 12 शतकात समाजातील वंचिंत आनि उपेक्षित घटक 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना आणि समाजा तील उपेक्षित घटकांना एकत्र आणले अशा या जगद्गुरू महात्मा बसवण्णा यांच काम हे जगात आदर्श वत आहे ,
असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली येथील राष्ट्रीय लिंगायत संघ यांच्या वतीने आयोजित बसव रत्न गौरव पुरस्कार सोहळ्यात केले, या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रा मध्ये विविध विभागात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय लिंगायत संघ यांचे वतीने सांगली येथे 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शरण राजशेखर तंबांखे,शरण उमाकांत होनराव ,शरण आनंद कर्णे ,शरण गंगाधर लकडे, राष्ट्रीय बसव दल खोजानवाडी,शरणी राजश्री सावर्डेकर ,शरण रविंद्र वाकडे यांना लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती सन्मान महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.सुरेशभाऊ खाडे, मा.मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षाचे प्रमुख मा.मंगेश जी चिवटे,राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदिप बापू वाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महत्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .
राष्ट्रीय लिंगायत संघ , संस्थापक अध्यक्ष प्रदिप बापू वाले समाजास संबोधित केले .या वेळी बसवपीठावर महाराष्ट राज्याचे कामगार मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे , मुख्यमंत्री आरोग्य सहायत्ता कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे सुमित कदम , अध्यक्ष डॅा विनोद परमशेट्टी , तहसीलदार राजेद्र कुंभार , शिवसेना जिल्हाघ्यक्ष संजय विभुते , जेष्ठ विश्वनाथ मिरजकर , संजय हिरेकर , मिलींद साखरपे , राजशेखर तंबाके , राजेद्र कुंभार , गटनेते मेघना हिंगमिरे , सरिता पट्टणशेट्टी , रूपाली गाडवे , रविंद्र बुकटे , सुरेद्र बोळाज , राजाराम पाटील , कैलाश स्वामी व लिंगायत बांधव उपस्थित होते .
या वेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मा विनायाक चिवटे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा ना श्री सुरेश (भाऊ) खाडे पालक मंत्री सांगली जिल्हा हे होते .
प्रशस्तीपत्र या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय लिंगायत संघाने या सर्व समाज बांधवांच्या कार्याची दखल घेवून पुरस्कार सोहळा आयोजित आहे. या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या कार्यक्रमा साठी सातारा आणि सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते
श्री.रविंद्र वाकडे यांना 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.
श्री.रविंद्र वाकडे यांना 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.
श्री.रविंद्र वाकडे यांना 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.
कराड , दि.17 -दिलीप महाजन .
राष्ट्रीय लिंगायत संघा तर्फे आज सांगली येथे माळी मंगल कार्यालय येथे सकाळी 11 ते दु.2 या वेळेत लिंगायत समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मधुकर वाकडे यांना लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती सन्मान महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.सुरेशभाऊ खाडे, मा.मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षाचे प्रमुख मा.मंगेश जी चिवटे,राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदिप बापू वाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रशस्तीपत्र या पुरस्काराचे स्वरूप आहे.या पुरस्काराबद्दल रविंद्र वाकडे म्हणाले की,आपणज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देण आहोत मग ते आपण कसे देऊ शकतो तर ते फक्त समजा कार्य के तरच , या साठी सर्वांनी हा विचार मनात ठेवून समाज कार्य करावे कोणतेही कार्य करताना निरपेक्ष भावनेने केले होते.परंतु राष्ट्रीय लिंगायत संघाने या कार्याची दखल घेवून मला जो पुरस्कार बहाल केला आहे.त्यामुळे मला अधिक प्रेरणा मिळाली आहे.या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार : डॉ. अरविंद भातांब्रे
महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार : डॉ. अरविंद भातांब्रे
महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार : डॉ. अरविंद भातांब्रे

लातूर दि १६ : प्रतिनिधी
लातूर शहरातील कव्हा नाका , महात्मा बसवेश्वर चौकातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी आपण बुधवार, दि. १९ एप्रिल २०२३ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी रविवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉ. भातांब्रे यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस कोरनेश्वर स्वामीजी उस्तुरी, संगनबसव स्वामी निलंगा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अरविंद भातांब्रे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला पहिली संसद दिली, लोकशाही दाखवून दिली. खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जनक असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा राष्ट्रीय महामार्ग उभारणीच्या कारणावरून हटविण्यात येणे ही बाब समाजाच्या भावनांना दुखावणारी आहे. हा केवळ लिंगायत समाजच नव्हे तर संपूर्ण बहुजनांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने हा पुतळा हटविण्याचा प्रयत्न केल्यास समाज त्याला प्रचंड विरोध करणार आहे. हा पुतळा हटविण्यात येऊ नये,अशी आपली आग्रही मागणी असून प्रशासनाला दि. १८ एप्रिल पर्यंतचा अल्टीमेटमही दिला आहे. १८ एप्रिलपर्यंत प्रशासनाने हा पुतळा हटविण्यात येणार नाही, अशी लेखी हमी नाही दिल्यास आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचे डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. आपल्या या आमरण उपोषणास लिंगायत समाजासह अनेक संघटना, समाजाचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरनेश्वर स्वामीजी यांनी यावेळी बोलताना महात्मा बसवेश्वर हे केवळ लिंगायतांचेच नव्हे तर समस्त बहुजन समाजाचे प्रेरणादायी नेतृत्व असून त्यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये ही समाजाची मागणी अत्यंत रास्त आहे. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांच्या भावना दुखावून पुतळा हटविण्याचा विचार योग्य नाही. प्रशासनाने पुतळा हटविण्याच्या निर्णयाबाबत समाजाच्या भावनांचा विचार करून हा पुतळा जैसे थे ठेवण्याचा निर्णय घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले. संगनबस्व महाराज यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाला हा पुतळा आहे त्या ठिकाणाहून न हटविण्याची विनंती केली. समस्त लिंगायत आणि बहुजन समाज अत्यंत सहनशील आहे. पुतळा हटविण्याचा निर्णय घेऊन या समाजाला कठोर भूमिका घेण्याची वेळ आणू नये,असे आवाहनही संगनबस्व स्वामी जी यांनी केले. त्याचबरोबर यावेळी लताताई मुद्दे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बसवराज धाराशिवे, राजाभाऊ राचट्टे, स्मिता ताई खानापुरे, पूजाताई पंचाक्षरी, ओमप्रकाश झुरूळे, बालाजीअप्पा पिंपळे, नितिन मोहनाळे, सचिन हुरदळे, राम स्वामी, रोहित चवळे, ओम धरणे, संकेत उटगे , नरेश पेद्दे , राहुल नारगुंडे , गणेश हेरकर, ऋषी झुंजे, बसवराज रेकूळगे , विजय शेटे , सतीश पानगावे, संजय बावगे, सुनील ताडमाडगे, नितीन नारगुंडे, संतोष सुलगुडले, सोनू डगवाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट.
झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट.
झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट.
कराड दि . 16 - रविंद्र वाकडे
दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मूलभूत हक्कांचा अधिकार देणारे, बौद्ध धर्माला पुनरुज्जीवन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे.
विविध विषयांवरील प्रबोधनातून मनोरंजन देणाऱ्या झी युवा या वाहिनीवरून सुरू होत असलेल्या जय भीम… एका महानायकाची गाथा या मालिकेतून डॉ. आंबेडकर यांचे कार्य या मालिकेतून उलगडणार आहे. १४ एप्रिल या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या मालिकेला सुरवात झाली. महानायकाच्या आयुष्यातील संघर्षापासून ते त्यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा आलेख पाहता येणार आहे.
तरुणाईच्या मनातील विषयांना मालिकांमधून मांडण्यासाठी सुरू झालेल्या झी युवा या वाहिनीने आता समाजातील प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रम व मालिकांमधील वैविध्य, प्रबोधन आणि मनोरंजनाची योग्य सांगड आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती यामध्ये झी युवा वाहिनी नेहमीच अग्रेसर आहे. आपल्या अभ्यासू नेतृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा यासाठी झी युवा वाहिनीचा पुढाकार कौतुकास्पद आहे. याच पंक्तीत आता झी युवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाची गाथा मालिकेच्या रूपातून मांडण्यासाठी सज्ज झाली आहे.
जय भीम … एका महानायकाची गाथा ही १४ एप्रिलला सुरू झालेली मालिका झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडदयावर दाखवण्यात आले आहे. यामध्ये झी युवानेही आपले पाऊल टाकले असून महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग, घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे. स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उद्धारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारित आहे. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.
झी युवा वाहिनीवर या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या मालिकेची प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता मालिकेत डॉ. आंबेडकर यांची व्यक्तिरेखा कोणता कलाकार साकारणार हे पाहण्याची आतुरताही आता शिगेला पोहोचली आहे. यंदा डॉ. आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. स्वतंत्र भारताला ७५ वर्ष झाली. हा योगायोग साधून झी युवा वाहिनीने महामानवाची गाथा मालिकेतून मांडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम करण्याचा संकल्प केला आहे.
Friday, April 14, 2023
कु. ऋतुजा खलीपे हिचे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण , उल्लेखनीय यश समस्त लिंगायत समाजाकडून अभिनंदन .
कु. ऋतुजा खलीपे हिचे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण , उल्लेखनीय यश समस्त लिंगायत समाजाकडून अभिनंदन .
कु. ऋतुजा खलीपे हिचे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण , उल्लेखनीय यश समस्त लिंगायत समाजाकडून अभिनंदन .
कराड , दि.15 -दिलीप महाजन प्रतिनिधी
कराड येथील लिंगायत समाजातील कार्यकर्ते राजीव खलीपे यांची कन्या कु.ऋतुजा हिने डॉ. जे. जे.मगदूम होमिओ पॅथीक कॉलेज, जयसिंगपूर येथून बी. एच.एम.एस. हि वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी नुकतीच विशेष श्रेणीत उत्तीर्ण होऊन प्राप्त केली
याबद्दल तिचे डॉ.शिवकांत चिंगळे ,अशोक संसुद्दी, सुनिल महाजन,शिवानंद डुबल,उदय हिंगमिरे,नंदकुमार बटाने,राजेंद्र घाटे,मिलिंद लखापत्ती,राजेंद्र भादुले,दत्तात्रय तारळेकर,सदाशिव साबणे,उमेश घेवारी,समस्त कराड व ओगलेवाडी समाजबांधव यांनी विशेष अभिनंदन केले.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लिंगायत टिव्ही लाईव्ह तर्फे तिचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण. सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे महात...












.png)
