Wednesday, August 3, 2022

येडेमच्छिंद्र गावचे सुपुत्र क्रांतिसिंह नाना पाटील . विशेष लेख प्रा.धनाजी बेंद्रे , येडेमच्छिंद्र



येडेमच्छिंद्र गावचे सुपुत्र क्रांतिसिंह नाना पाटील . विशेष लेख प्रा.धनाजी बेंद्रे , येडेमच्छिंद्र




येडेमच्छिंद्र गावचे सुपुत्र क्रांतिसिंह नाना पाटील . विशेष लेख प्रा.धनाजी बेंद्रे , येडेमच्छिंद्र
सातारा दि 3:- 
येडेमच्छिंद्र गावचे सुपुत्र क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा 
      भारतीय स्वातंत्र्यलढयामधील एक झुंझार नेते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil) यांच्याकडे पाहिले जाते. प्रामुख्याने सातारा, सांगली भागात त्यांनी स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ उभी केली. पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवला. ग्रामराज्याची स्थापनाही त्यांनीच केली. अशा या थोर सेनानीची आज जयंती . क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी येडेमच्छिंद्र येथे झाला. ग्रामीण भागातील बहुजनसमाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे नानांचे प्रमुख योगदान होय.

संसदेत मराठीत भाषण करणारे ते पहिले खासदार होते. इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे ते थोर स्वातंत्र्यसेनानी होते. क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात दिलेले योगदान तसेच देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील,
क्रांतिसिंह नाना पाटील खऱ्या अर्थानं ‘क्रांतिसिंह’होते. महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरु केलेल्या असहकार चळवळीपासून इंग्रज सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘प्रतिसरकार’आंदोलनापर्यंतचा त्यांचा लढा भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या दीड हजार गावात ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता.

स्वातंत्र्य लढ्याबरोबरंच त्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान दिले. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. 1920 ते 1942 या काळात नाना 8-10 वेळा तुरुंगात गेले. 1942 ते 46 या काळात ते भूमिगतच होते अशा या थोर नेत्यास त्रिवार अभिवादन


No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...