गावचा कृती आराखडा तयार करणे, विविध विकासकामांचे नियोजन तथा तंटामुक्त समितीची स्थापना यासाठी या महिन्यात ग्रामसभा घेण्याची विरोधी पक्षाची मागणी ..
खानापूर:दि 23 प्रतिनिधी:- ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. गरज पडली तर तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषदेची स्थायी समिती आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले तर असाधारण बैठकही बोलावता येते. ग्रामपंचायतीच्या एकूण सहा ग्रामसभांपैकी चार ग्रामसभा ठराविक महिन्यामध्ये बोलावणे आवश्यक आहे. वित्तीय वर्षातील पहिली ग्रामसभा एप्रिल / मे मध्ये, दुसरी ग्रामसभा १५ ऑगस्ट [स्वातंत्र दिनी], तिसरी ग्रामसभा ऑक्टोबर मध्ये, आणि चौथी ग्रामसभा २६ जानेवारी [प्रजासत्ताक दिन] रोजी घेणे अपेक्षित आहे. तसेच उर्वरित दोन ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार घेण्यात याव्यात. दोन ग्रामसभेमध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये असा शासन नियम आहे.त्या अनुषंगाने ,१५ आगस्ट ते ३१ आगस्ट दरम्यान ग्रामसभा घ्यायला हवी होती मात्र ती कोरोना परिस्थिती मुळे झाली नसुन आता गावात मागील सहा महिन्यांपासून एकही कोरोना रूग्ण नाहीत, त्यामुळे ग्रामसभा घेण्यास परिस्थिती अनुकूल आहे,व गावचा कृती आराखडा तयार करणे, विविध विकासकामांचे नियोजन तथा तंटामुक्त समितीची स्थापना यासाठी या महिन्यात ग्रामसभा घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन खानापूर चे ग्रामविकास अधिकारी गणेश कोकणे यांना खानापूर ग्रामपंचायत च्या विरोधी पक्षातर्फे देण्यात आले आहे,सदर निवेदनावर,सौअनुसया अनंतराव पाटील, सौ.प्रतिभाताई अटकळे,सौ.अर्चना विश्वनाथ ताडकोले,सौ.शिवनंदा परबते,सौ.राजाबाई यनलवार व श्रीदेवी कामशेटे यांच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment