महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्येआचरणात आणणे अत्याश्यक आहे ,डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ .
महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्येआचरणात आणणे अत्याश्यक आहे ,डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ .
पुणे दि २७ :- संजय शहापुरे प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्येआचरणात आणणे अत्याश्यक आहे , असे प्रतिपादन डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ . लिंगायत धर्म महासभा आणि राष्ट्रीय बसव दल यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे केले ,बसव जयंतीचा उत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते , येथील अंकुशराव लांडगे सभागृह.या ठिकाणी बसव जयंतीचा उत्सव भरगच्च उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा झाला.
या सोहळ्यामध्ये डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्या हस्ते ध्वज रोहन करण्यात आले.त्याचप्रमाणे नगरकर सरांच्या व्याख्याना द्वारे महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्ये कशाप्रकारे वैज्ञानिक विचार करता येईल याविषयी अनेक उदाहरणांद्वारे सर्व श्रोत्यांना माहितीपर व्याख्यान देण्यात आले.एका शास्त्रज्ञाला कार्यक्रमासाठी बोलावून त्यांचे विचार व बसवेश्वर तत्वज्ञानाचा सद्यस्थितीत कसा वापर करावयाचा याविषयी समाजातील युवकांना आणि नागरिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणे हा एक मोठा परिवर्तनाचा भाग, बसव जयंती मध्ये झाला आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सतीश पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली.


No comments:
Post a Comment