Monday, December 19, 2022

समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उदघाटक श्री शिवराज शेटकार सातारा येथे वधू - वर - पालक परिचय मेळावा संपन्न

 


समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन   उदघाटक श्री शिवराज शेटकार    सातारा येथे वधू - वर - पालक परिचय मेळावा संपन्न 




      समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन   उदघाटक श्री शिवराज शेटकार    सातारा येथे वधू - वर - पालक परिचय मेळावा संपन्न 



सातारा, दि.19 -रविंद्र वाकडे 

 वीरशैव लिंगायत समाजाचा 16 वा वधू - वर पालक परिचय मेळावा प. पू.औंधकर महाराज मठ,बुधवार पेठ, सातारा येथे रविवार दि.18 रोजी सकाळी 10 ते  संध्याकाळी 5 या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाची सुरुवात म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन उद्घाटक मा.शिवराज शेटकार, मा.अध्यक्ष,अखिल भारतीय वीरशैव सभा , याच्या हस्ते करून करण्यात आली.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.निशांतशेठ गवळी, मा. प्रदिप बापू वाले, मा.शिवराज शेटकार,भारतशेठ बारवडे, सागरदादा कस्तुरे, दिलीप ढोले,जंगम गुरुजी, लिंगायत TV Live चे  प्रा.अजय शेटे,कार्तिक स्वामी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. व व्यासपीठावरील कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.सुवर्णा कवारे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय व स्वागत व  सचिव श्री.माधव मेंडीगेरी यांनी केले .




यावेळी एम.पी.एस.सी .परीक्षेच्या माध्यमातून शासकीय पदाला गवसणी घातलेल्या समाजातील कु. मयुरी रामचंद्र देशमाने ,कराड व कु. गणेश वसंत तोडकर , देगाव , ( विक्रीकर निरीक्षक ) सातारा यांचा विशेष सत्कार सौ.निर्मलाताई बारवडे यांच्या हस्ते करण्यात आला.



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.सागरदादा कस्तुरे यांनी केले. ते म्हणाले की,समाजात अनेक संघटना वाढत असून त्यांच्यात एकीची भावना कमी होत चालली आहे.हे चित्र बदलून सर्वांनी संघटित झाले पाहिजे. यावेळी या सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला.   वीरशैव लिंगायत समाज,साताराच्या अध्यक्षपदी निवड झाले बद्दल मा.श्रीनिवास भाऊ कामळे , भिंगे गुरुजी,अकलूज यांचा सत्कार मा.भारतशेठ बारवडे यांच्या हस्ते  करण्यात आला.

 समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन   उदघाटक श्री शिवराज शेटकार अध्यक्ष  अखिल भारतीय वीरशैव सभा ,लातूर यांनी  केले .




 वधू - वर सूचक मेळाव्यामध्ये चागले वधू वर संशोधनाचे काम उत्तम प्रतीने पार पडत आहे.प्रत्येकाने अवास्तव अपेक्षा सोडून योग्य स्थळ निवडीला प्राधान्य दिले पाहिजे.असे मत  मा.प्रदिपबापू वाले , प्रमुख अतिथी, शरण  प्रदिप (  बापू ) वाले , राष्ट्रीय लिंगायत संघ  राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केले .



      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.रमेश भांदुर्गे,  म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ ,वीरशैव लिंगायत समाज सेवा मंडळ व लिंगायत भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.




कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर वधू - वर व स्त्री - पुरुष पालक उपस्थित होते.नवीन युवा तरुणी व महिला यांनी नोंदणी प्रक्रियेला मोलाची मदत केली. यामध्ये स्नेहल तावसकर,स्वाती बारवडे,अर्चना धबधबे,कबाडे,वासंती महापरळे,निर्मलाताई बारवडे यांनी योगदान दिले,युवा नेतृत्व अक्षय विघ्ने यांनी वधू- वरांचा उत्तम प्रकारे परिचय करून दिला. मंडळातर्फे सर्वांची उत्तम अशी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कोषाध्यक्ष श्री.सिद्धराज शेटे यांनी आभार प्रदर्शन  केले. कार्यक्रमाच्या शेवटी चहापान करून कार्यक्रमाची अतिशय आनंदाने सांगता झाली . 

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...