दुःखद निधन
गौरीशंकर स्वामी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन .
गौरीशंकर स्वामी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन .
लातूर दि १६ :- प्रतिनिधी
येथील पाचशे घर मठाचे तत्कालीन पुजारी गौरीशंकर लिंगया स्वामी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता आल्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वीरशैव लिंगायत स्मशानभूमी, लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लातूर येथील पाचशे घर मठाजवळ राहणारे गौरीशंकर लिंगायत स्वामी यांनी पाचशे घर मठ संस्थानचे पुजारी विश्वस्त म्हणून वीस ते पंचवीस वर्ष सेवा केली. मागील काही वर्षापासून वयोमानानुसार त्यांनी मठसंस्थांच्या सेवेतून सेवानिवृत्ती घेतली होती. ते धार्मिक वृत्तीचे, कायम हसरे, मन मिळाऊ वृत्तीचे होते. ते आपल्या घरी सायंकाळच्या वेळेला बसलेले होते. यावेळी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री 10.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर वीरशैव लिंगायत स्मशानभूमी, लातूर येथे शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता मामी, मुलगा नागेश, सून, नातू नाती असा मोठा परिवार आहे.ते शिवाजी विद्यालयाचे सहशिक्षक विकास स्वामी आणि पत्रकार वैभव स्वामी यांचे मामा होते. स्वामी परिवारावर कोसळलेल्या दुःखात दैनिक समर्थ राजयोग परिवार सहभागी आहे.


No comments:
Post a Comment