गोदाकाठचं धाडसी नेतृत्वःजनसामान्यांचा बहुजन नेता – प्रा. मनोहर धोंडे
गोदाकाठचं धाडसी नेतृत्वःजनसामान्यांचा बहुजन नेता – प्रा. मनोहर धोंडे
देगलूर दि २ :- शिवकुमार कल्याणी लिंगायत टिव्ही देगलूर
नांदेड – लातुर राष्ट्रीय महामार्गावर सोनखेड पासून अवघ्या 7 कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सानीध्यात गोदावरी नदीकाठावर असलेल्या शेवडी (बा)ता. लोहा जि.नांदेड या छोट्याश्या गावी २ फेब्रुवारी १९६७ रोजी मनोहर बाबाराव धोंडे सरांचा शेतकरी कुटुबात जन्म झाला गावातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत १ ते ७ वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण नांदेड येथे ८ वी ते १० वी पिपल्स हायस्कूल नांदेड येथे तर ११ वी व १२ वी यशवंत कॉलेज नांदेड येथे शिक्षण घेतले. आभ्यासात हुशार असल्यामुळे १२ वी नंतर प्रा. धोंडे सरांनी बी.एस्सी ( भूर्गभशास्त्र ) हा विषय घेवून सायन्स काॅलेज नांदेड येथे पुढील शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. तेव्हाचे मराठवाडा विद्यापीठातुन बी.एस्सी. मिरिट मध्ये आले .त्यानंतर उच्च शिक्षण एम. एस्सी भूगर्भशास्त्र
शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद येथे पूर्ण केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या सोलापूर येथील उपकेद्रातून भूभूगर्भशास्त्र सरांनी एम.फील चे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यानी सायन्स कॉलेज नांदेड येथे जुन १९८९ रोजी वरीष्ठ प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. नौकरी करतानाच शासकीय बि.एड. काॅलेज नांदेड येथे बि.एड.पदवी पुर्ण केली.परंतु तेथे मन रमत नसल्याने त्यांनी नांदेड येथील नौकरी सोडून 18 जुलै १९९१ रोजी औरंगाबाद येथील नावाजलेल्या देवगिरी महाविद्यालयात ते पून्हा प्राध्यापक म्हणून रुजू झाले. औरंगाबाद येथील मौलाना आझाद अध्यापक महाविद्यालयात येथे एम.एड. पदवी पुर्ण केली. देवगीरी काॅलेज येथे आध्यापनाचे कार्य करत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उज्जवल यश संपादन करुन जालना येथे राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली परंतु सरांनी ती शासकीय नौकरी केली नाही.
प्रा. मनोहर धोंडे सर यांनी विद्यार्थी दशे पासूनच विविध आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. स्पष्ट वक्ता, धाडसीपणा, अंगी असल्यामुळे काही तरी नविन करण्याचा गुण त्यांच्यात असल्याने त्यांनी एम.एस्सी.चे शिक्षण घेत असतानाच १२ ऑगस्ट १९८८ रोजी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना केली तेव्हा शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्यावर मोठा विश्वास ठेवून प्रा. धोंडे सर यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेना मराठवाडा प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली. सरांनी अत्यंत मेहनत घेवून भारतीय विद्यार्थी सेना मराठवाड्याच्या कानाकोप-यात पोहचविली. सराकडे आजही हे पद कायम आहे. या माध्यमातून प्रा. धोंडे सरांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती , फीस संदर्भात तसेच विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचा प्रश्न, अडी अडचणी, फी वाढ, या संदर्भात आंदोलने करुन विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळोवेळी मार्गी लावले. १९८८ ला मराठवाड्यात भारतीय विद्यार्थी सेनेचा शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद येथे पहीला पॅनल विजयी करून विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष होऊन झेंडा फडकविला.त्याचवेळी शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. धोंडे सर यांची पक्ष निरिक्षक म्हणून नांदेड जिल्हयासाठी नियुक्ती केली होती. १९८९ साली जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथे शिक्षण घेणारे श्री. अर्जून खोतकर ( सध्याचे मंत्री ) यांची भारतीय विद्यार्थी सेना जालना जिल्हा प्रमुख म्हणून सरांनी निवड केली. यानंतर1990 च्या विधानसभा निवडणूकीत सरांच्या शिफारशी वरून भा.वि. सेनेचे श्री. अर्जून खोतकर यांना जालना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली त्यात ते विजयी झाले प्रा.धोंडे सर यांनी शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार १६ जून १९९५ रोजी शिवसेनेच्या वतीने मराठवाडा पदविधर मतदार संघातून निवडणूक लढविली. त्यानंतर १९९९ च्या पोटनिवडणुकीत दुस-यांदा मराठवाडा पदविधर मतदार संघातून शिवसेने कडून निवडणूक लढविली. त्यानंतर लोहा – कंधार मतदार संघातून शिवसेनेकडून २००९ साली विधानसभेची निवडणूक लढविली.आजही ते गोरगरीब, बहुजनांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत
शिवा संघटनेची भरारी...!
अन् सर्वोच्च न्यायालयातून लढा जिकंला...!
व त्यांचा छळ होवू नये यासाठी महाराष्ट्रासह देशभर या याचिकेद्वारे महीला सुरक्षेचा कायदा लागू झाला.आणि प्रा.धोंडे सर यांच्या या धाडसामुळे देशभरातील महिलांना न्याय मिळाला.
नांदेड –लोहा- अहमदपूर – लातुर रोड रेल्वे मार्गास मंजुरी
प्रा. मनोहर धोंडे सरांनी नांदेड – लोहा – अहमदपूर – लातूर रोड रेल्वे मार्गास मंजूरी द्यावी अशी करून प्रचंड धडक मोर्चा काढला परंतु परंतु रेल्वे मंत्रालयाने मागणी मंजूर न केल्याने स्वतः प्रा. धोंडे सरांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदेड – लोहा – अहमपुर – लातूर रोड, रेल्वे मार्गास मंजूरी मिळाली. यानंतर हे श्रेय घेण्यासाठी इतर नेत्यात चढाओढ लागली. सरामुळे रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला.
किल्लारी भूकंपात कामगिरी
मोर्चे, आंदोलने, न्यायालयीन लढा, देवून प्रा. धोंडे सरांनी बहुजन विस्थापितांना तसेच सर्व स्तरातील जनतेला न्याय दिला आहे.
सरांचा आज ५२ वा वाढदिवस... त्यांना कोटी कोटी शुभेच्छा....
No comments:
Post a Comment