ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं
सोमवारी वृद्धापकाळाने निधन.
ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं
सोमवारी वृद्धापकाळाने निधन.
सातारा दि. ३ :- रविंद्र वाकडे
ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. आपल्या वाणीने त्यांनी लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले. माणुसकीच्या विचारांनी भारावून टाकले. कशाचेही स्तोम नाही, अवडंबर नाही अशी त्यांची साधी राहणी होती. ते जसे उच्च पदस्थ, धनिकांना जवळचे वाटत तसेच गोरगरीबांनाही आपले वाटत. कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र सीमावर्ती भागात त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. ज्ञानयोगी आश्रम, विजयपूर (कर्नाटक) येथील परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांचे काल रात्री देहावसन झाले. तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक, विचारवंत आणि महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या माणुसकीच्या विचारांचा प्रसारक आपल्यातून हरपले . शिवैक्य झाले .
कर्नाटक सरकारनं मंगळवार, 3 जानेवारीला विजयपुरा येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीये.कर्नाटक सरकारनं सिद्धेश्वर स्वामींचं अंतिम संस्कार राज्य सन्मानानं करण्याचा निर्णय घेतलाय. आज, मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वामीजींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसह कर्नाटक चे मुख्यमंत्री बोम्बई, अन्य नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार नाकारल्यानंतर स्वामीजी प्रकाशझोतात आले होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून माहिती दिली होती.
आज स्वामीजी देहरूपाने आपल्यात नाहीत पण त्यांनी कानडी भाषेत लिहिलेली पुस्तके, त्यांची रेकॉर्ड केलेली व्याख्याने आपल्यासोबत कायम आहेत.हा आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या निधनाने समस्त लिंगायत समाजातील बांधवांकडूनशोक व्यक्त केला जात आहे त्यांच्या निधनाने समाजात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे .

No comments:
Post a Comment