खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ.
खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ.
खानापूर दि 14;- ( शिवकुमार कल्याणी,) लिंगायत टिव्ही लाईव्ह:
खानापूर ता.देगलूर येथे प्राचीन काळापासून चालू असलेली विरभद्र स्वामी यात्रेला दि ( १० ) गुरुवार पासुन सुरुवात झाली असुन हि यात्रा दि (१६) पर्यंत चालणार आहे अशी माहीती विरभद्र मठाचे मठाधिपती श्री गुंडयाप्पा स्वामी,व शिवराज स्वामी यांनी दिली.
खानापूर चे ग्रामदैवत श्री विरभद्र स्वामी महाराजाच्या यात्रेला दि (१०) गुरुवार पासुन सुरुवात झाली असुन यात्रेच्या पहील्या दिवशी दि १०रोज गुरुवारी विरभद्र स्वामी महाराजास हाळद लागते.व मानाचे अभीषेक होतात.दि १५ रोजी सकाळी मठात धगधगते अग्निकुंड प्रज्वलित केले जाते त्यातुन ,श्री विरभद्र स्वामी यांची प्रतिकृती घेवुन मठाधिपती यातुन अकरा वेळा फेरी मारतात ,व त्यानंतर गावकरी यातुन चालतात,हे अग्निकुंड तुडवल्यामुळे शरीरातील व्याधी, रोग,बाधा नष्ठ होतात अशी येथे अख्यायिका आहे,
त्यानंतर गावभरातुन ग्रामदैवत विरभद्र स्वामी यांची रथयात्रा निघते व यामध्ये अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने सामिल होतात,या रथयात्रेत भजणी मंडळी,व गावातील महिला व तरुण तरुणी कलश,व पताके घेऊन चालतात,या मठाचे अनेक राज्यांत शिष्यगण आहेत ते आवर्जून येतात
या यात्रेसाठी महाराट्रासह शेजारील कर्नाटक,आध्र प्रदेष मध्यप्रदेश ,आदी राज्यातील अनेक भावीक येथे दर्शनासाठी येउन दर्शन घेतात. विरभद्र स्वामी हे नवसाला पावनारे देवस्थान असुन येथे ईछ्या पुर्ण होण्यासाठी नवस बोलले जातात. व ते पुर्ण करण्यासाठी भावीक येथे येतात. येथे नवस पुर्ण झाल्यानंतर जावळ, अभिषेक ,अन्नपुजा असे विधी करतात..या यात्रेत सर्वांनी सामिल होऊन भगवान विरभद्र स्वामी यांचे आशिर्वाद घ्यावे असे आवाहन यात्रा समिती तथा मठाधिपती गुंडय्याप्पा स्वामी, शिवकुमार स्वामी,शिवराज महाराज मठवाले यांनी केले आहे..


No comments:
Post a Comment