Monday, November 15, 2021

श्रीमंत छ.शिवाजी महाराज यांचा चालता..बोलता..इतिहास... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

श्रीमंत छ.शिवाजी महाराज यांचा चालता..बोलता..इतिहास...
  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.विशेष लेख
प्रा.अजय शेटे..वडूज.
.. ज्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास वाचून नाहीतर आपल्या जीवन अनुभवातून जिता.. जागता केला.आपल्या अमोघ वक्तृत्व वाणी ने शिवमहिमा मनामनात व घराघरात पोहचवला.शिवचरित्र नसानसांत भिनवले.ते शिवशाहीर बाबासाहेब उर्फ बळवंत मोरोपंत पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला..
..शिवशाहीर बाबासाहेब यांना 100 वर्षाचे निरामय शतायुषी आयुष्य लाभले.गेली 70 वर्षे ते सत्य इतिहास संशोधनाचे कार्य करत आले.यासाठी त्यांना इतिहास संशोधक  कै.ग. ह.खरे यांचे गुरू म्हणून मार्गदर्शन लाभले.पुणे विद्यापीठाच्या ' मराठा इतिहासाची शकावली ..सन 1740 ते 1764 ' या भारत इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या प्रकल्पात संशोधक म्हणून कार्य करण्याची मोठी संधी मिळाली .
..त्यांनी ऐत्याहासिक विषयात सावित्री.. जाळ त्या ठिणग्या.. मुजऱ्याचे मानकरी..राजा 
शि वछत्रपति..शेलार खिंड..महाराज.. पुरंदरेंचा सरकारवाडा.. शन वार वाड्यातील शमादान.. शिलंगणाच सो नं..पुरंदरच्या बुरुजावरुन ..कलावंती णी चा सज्जा..महाराजांची राज चिन्हे..पुरंदरे ची नौबत.. ई.साहित्य लेखन केले.राजा छत्रपतीं या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित होऊन 5 लाखा हून अधिक प्रती खपल्या हा एक विक्रम आहे..
..बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश..विदेशात मिळून एकूण 12 हजाराच्या वर व्याख्याने दिली हा पण एक विक्रम आहे..
..त्यांनी  छ.शिवरायांच्या जीवनावरील ' जाणता राजा ' या भव्यदिव्य दृश्य नाटकाचे दिग्दर्शनही केले .या महा नाट्याचे निर्माते म्हणून त्यांनी गेल्या 27 वर्षात 1250 हून अधिक प्रयोग केले.हे नाटक मराठी..हिंदी..इंग्रजी सह इतर 5 देशी..विदेशी भाषेत अनुवादित झाले.या नाटकात एकूण 150 स्त्री..पुरुष कलावंत काम करतात.शिवाय 4 हत्ती  व 20 घोडे यांची पण महत्वाची भूमिका आहे.या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी कमीत कमी 10 एकराचे मैदान लागते. व तेथील फिरता रंगमंच उभारणीसाठी आधीचे 10 दिवस व उतरविण्यासाठी नंतरचे 5 दिवस लागतात..हा पण एक विक्रम आहे..
..त्यांच्या या ऐत्याहसिक कार्याची दखल घेवून सन 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांचा ' महाराष्ट्र भूषण '  व भारत सरकारने सन 2019 मध्ये ' पद्मविभूषण ' हा सर्वोच्च पुरस्कार देवून  त्यांचे देशप्रेमी कार्याचा गौरव केला आहे..
..वंदनीय बाबासाहेब नेहमी म्हणत ..मी छ.शिवाजी महाराजांच्या पायाचा पावन स्पर्श झालेल्या  प्रत्येक जागेवर पोहचलो आहे..एक स्वर्ग फक्त बाकी राहिलाय..
आज त्यांनी आपली ती अखेरची इच्छा पण पूर्ण करून घेतली..
.. महाराष्टातील गड किल्ले..मराठा साम्राज्य..ऐत्याहसिक दस्तऐवज व कागदपत्रे यांच्याकडे तरुणांना नव्या अभ्यासू दृष्टीने पाहण्याचा आयाम देणारा एक महान शिवशाहीर देह रूपाने आपल्या तून निघून गेला असला तरी तो त्यांच्या ऐत्याहसिक कार्य..कीर्ती रूपाने आपल्या स्मरणात कायम राहील...
..वंदनीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तमाम जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा .. मानाचा मुजरा..**

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...